आय.बी.टी. विभाग

Introduction to Basic Technology
मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख
MSFC - Multi Skill foundation Course

विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याचे काम विज्ञान आश्रम गेली ३१ वर्षाहून अधिक काळ करत आहे.'शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास' हे धेय्य डोळ्यासमोर ठेवून जानेवारी  १९८३ मध्ये डॉ.श्रीनाथ कलबाग यांनी विज्ञान आश्रम ची स्थापना केली.
हाताने काम करत करत शिकणे हि शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे.एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करणे,ती परत परत करून बघणे व आत्मसात करणे याच पद्धतीने आपण शिकत असतो.लहान मुल आपली मातृभाषा याच पद्धतीने शिकते.केवळ पुस्तकी शिक्षणाने विद्यार्थी परीक्षेतील प्रश्न सोडवतील पण जीवनात यशस्वी होण्यासाठी 'कृतियुक्त'शिक्षण आवश्यक आहे.विध्यार्थामध्ये लहानपणापासून उपक्रमशील,धडपडी वृत्ती जोपासायची असेल तर विध्यार्थ्याना 'उत्पादक कामातून' शिकविले पाहिजे असे विज्ञान आश्रम मानतो.शालेय स्तरापासून 'कार्यकेंद्री' शिक्षणाचा पुरस्कार विज्ञान आश्रम करत आहे.


·         आय.बी.टी. ची तत्वे.:-
१.हाताने काम करत करत शिकणे - हि शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे.यात केवळ पुस्तकातून पाठांतर न करता विद्यार्थी विविध कामे करत करत त्या विषयासंबंधी तत्वे आत्मसात करतो.
२.बहुविध कौशल्यांचे शिक्षण - केवळ एखादे विशिष्ट कौशल्य शिकण्यापेक्षा विध्यार्थ्यांनी विविध कौशल्याचे शिक्षण घेणे फायदेशीर असते.विद्यार्थ्यांना विविध कामाची ओळख होते व त्यातून त्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते.
३.शाळा हे उत्पादन केंद्र असावे - विद्यार्थ्याना कामाचा प्रत्यक्षात अनुभव मिळावा.यासाठी त्यांनी प्र्त्यक्स्त कामात सहभाग घेणे आवश्यक असते.शाळेत उत्पादन व्हावे व त्या द्वारे समाजाला योग्य दरात सेवा पुरवल्या जाव्यात.असा विज्ञान आश्रम चा प्रयत्न असतो.
४. निर्देशक हाच उद्योजक असावा.
"मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख " (v1) ची सुरुवात १९८७ साली झाली.इ.आठवी ते १० वी चे विद्यार्थी 'हाताने काम करत शिकणे' या तत्वावर शिकतात या अभ्यासक्रमास v1 म्हणून S.S.C. बोर्डाची मान्यता आहे व कोणत्याही शाळेमध्ये टो राबविता येतो.आठवड्यातील एक दिवस शाळेमध्ये या विषयासाठी द्यावा लागतो.
  • अभ्यासक्रम:-

  • ·         विद्यार्थ्यांना होणारे फायदे -

हा अभ्यासक्रम बहुविध कौशल्याचा असल्याने विध्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरची  दिशा निवडण्यासाठी मदत होते. अनेक कौश्यल्यांची ओळख झाल्याने तो त्याच्या आवडीचे एक क्षेत्र निवडू शकतो .
महत्त्वाचे म्हणजे विविध अनुभव मिळाल्याने विध्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते. विविध शाखांचे ज्ञान मिळाल्याने त्याला विविध मुलभूत तत्त्वे व त्यांचे महत्त्व याची ओळख होते.

प्रत्यक्ष व्यवहारात काम करताना आपल्याला अनेक कौशल्याचा वापर करावा लागतो . उदा. शेतकऱ्याला शेतीच्या ज्ञानाबरोबर वीज , मोटार पंप, खाद्य संरक्षण व प्रक्रिया , पशु वैद्यकीय ज्ञान लागते. त्यामुळे अडचणीच्या वेळी तो मार्ग काढू शकतो. एखाद्या फॅब्रिकेशन व्यवसायिकाला जर पोल्ट्री बांधण्याचे काम मिळाले तर त्याला पोल्ट्रीचे मुलभूत ज्ञान हे फायद्याचे ठरू शकते, तो गिऱ्हाईकाला अधिक चांगली सेवा देऊ शकतो , अशा प्रकारचा आंतरशाखीय दृष्टीकोन विकसित होतो.


  • विद्यार्थांचे उपक्रम: 




No comments:

Post a Comment